भगवंतावर अकारण प्रेम करावे.
खरोखर, जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही. भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय, परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचे देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारे समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट, ज...