मनुष्याने प्रपंचात कसे वागावे ?
खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच. ‘मी कर्ता’ ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते. मनुष्याला वाटत असते की, आपल्याला दु:ख होऊ नये, आजारपण येऊ नये. पण तरीसुद्धा आजारपण आणि दु:ख तो टाळू शकत नाही. म्हणजे ‘मी कर्ता’ ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते. मालकी नसताना घराची मालकी गाजविण्याचा आपण प्रयत्न करतो याला काय करावे ! तेव्हा प्रापंचिकांत आणि संतांत फरक हाच की, ते कर्तेपण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो. ‘राम कर्ता’ म्हणावे की सुख,...