| १८४५ |
१९ फेब्रुवारी (माघ शुद्ध १२ शके १७६६) सकाळी गोंदवले येथे जन्म |
| १८५o |
श्रीमहाराजांचा व्रतबंध - नदीकाठी एकांतात ध्यानधारणा |
| १८५५ |
गुरूच्या शोधार्थ कोल्हापूरला प्रयाण |
| १८५६ |
खातवळच्या संभाजीराव गोडसे यांच्या कन्येबरोबर विवाह |
| १८५७ |
आजोबा लिंगोपंत यांचे निधन |
| १८५८ |
गुरूच्या शोधार्थ परत गृहत्याग, मार्गात हरिपूरच्या राधाबाई, मिरजेचे आण्णाबुवा, नाशिकचे देव-मामलेदार, अक्कलकोटचे स्वामी समर्थ, हुमणाबादचे माणिक प्रभू, काशीमधील तेलंग स्वामी, बंगालचे रामकृष्ण परमहंस इत्यादींच्या भेटी. शेवटी समर्थ संप्रदायातील सत्पुरुष श्रीरामकृष्ण यांचा येहेळेगावच्या श्रीतुकारामचैतन्य यांच्याकडे जाण्याचा आदेश |
| १८५९ |
श्रीतुकामाईची येहेळेगाव येथे भेट. नऊ महिन्यांच्या खडतर सेवेनंतर अनुग्रह |
| १८६० |
गुरूंच्या आज्ञेनुसार नैमिषारण्याकडे प्रयाण |
| १८६१ |
श्रीमंत नानासाहेब पेशवे यांची नैमिषारण्यातील गुहेत भेट |
| १८६३ |
अयोध्या, काशी, वृन्दावन यात्रा करून कलकत्ता येथे हरिहाट |
| १८६४ |
इंदूरला उन्मनी अवस्थेत प्रकट |
| १८६५ |
गोंदवल्यास पुनरागमन - गृहस्थाश्रमास सुरुवात |
| १८७४ |
पत्नीसह श्रीतुकामाईंचे दर्शन. नंतर नाशिकला पत्नीस योगदीक्षा |
| १८७५ |
नाशिकहून इंदोर, काशी, अयोध्या, नैमिषारण्य इत्यादी ठिकाणी जाऊन गोंदवल्यास आगमन |
| १८७६ |
गोंदवल्यास भीषण दुष्काळ, दुष्काळी कामे, अन्नदान |
| १८७७ |
पुत्रप्राप्ती, पत्नी व पुत्राचे थोड्या दिवसांनी देहावसान |
| १८७८ |
वडील रावजी यांचे निधन. नंतर आटपाडीच्या देशपांडे यांच्या अंध मुलीशी विवाह |
| १८८०-९० |
पुन्हा भ्रमण. इंदूर येथे श्रीआनंदसागर व श्रीब्रह्मानंद श्रींना प्रथम भेटले व कालांतराने अनुग्रह - गोंदवल्यास पुनरागमन |
| १८९१-92 |
गोंदवले येथे थोरले श्रीराममंदिराची स्थापना |
| १८९४-९५ |
गोंदवले येथे धाकटे श्रीराममंदिराची स्थापना |
| १८९५ |
मातुश्री गीताबाईसह काशी, प्रयाग, अयोध्या यात्रा, अयोध्येस मातुश्रींचे निधन, इंदूर, हर्दामार्गे गोंदवल्यास आगमन |
| १८९६ |
पुन्हा नैमिषारण्यात निघाल्यावर श्रीरामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात |
| १८९५-९६ |
सोलापूर व जालना, बेलधडी श्रीराममंदिरांची स्थापना |
| १९०० |
हर्दा येथे पट्टाभिषिक्त श्रीरामरायाची स्थापना |
| १९०१ |
यावंगलला श्रीदत्त मंदिर, गिरवी आणि मांडवे येथे श्रीराममंदिरांची स्थापना |
| १९०२ |
लो. टिळक व प्रो. जिनसीवाले यांच्या बरोबर वेदान्त चर्चा |
| १९०३ |
म्हासुर्णे व गोमेवाडी येथे श्रीरामाच्या मूर्तींची स्थापना |
| १९०५ |
प्रयागला बुडणाऱ्या नावेतून भक्तांना वाचविले |
| १९०६ |
नैमिषारण्याकडे प्रयाण, नानासाहेब पेशवे यांचा अंतकाल साधला |
| १९०८-०९ |
पंढरपूर व मोरगिरीला श्रीराममूर्तींची स्थापना |
| १९०९ |
श्रीरामरायाच्या डोळ्यातून अश्रुपात. आटपाडी, कुर्तकोटी व हुबळीस श्रीराममंदिरांची स्थापना |
| १९१० |
मुंबईस सर भालचंद्र भाटवडेकरांच्याकडे आठवडाभर वास्तव्य |
| १९११ |
कऱ्हाडला श्रीरामंदिराची स्थापना |
| १९१२ |
सिद्धेश्वर कुरोली येथे श्रीराममंदिराची स्थापना |
| १९१३ |
पंढरपूरला श्री. वल्हवणकरबुवांचे बरोबर अध्यात्म संवाद - गोंदवल्यास शनिमंदिर स्थापना |
| १९१३ |
२१ डिसेंबर गोंदवल्यास श्रीरामरायासमोर शेवटचे कीर्तन |
| १९१३ |
२२ डिसेंबर (मार्गशीर्ष वद्य १० शके १८३५) सकाळी श्रींचे महानिर्वाण |